Rohini Hattangadi : ‘गांधी’ या आयकॅानिक हिंदी चित्रपटातून सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रवासावर मनोसोक्त गप्पा मारल्या. गांधी चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले. त्या ७५ वर्षांच्या झाल्या असून, हिंदी मराठीसह तमिळ, तेलुगू, अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. त्यांचे सिनेसृष्टीत खूप मोठे योगदान आहे. त्यांंनी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून रोहिणी हट्टंगडी टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून अंतर राखले आहे. यामागचे कारण त्यांनी मुलाखतीत दिले आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी ‘द फ्री प्रेस जर्नल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत टीव्ही मालिकांमध्ये काम न करण्याच्या निर्णयाबद्दल मोठा खुलासा केला. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. “मी तरुण असताना जिम वगैरे नव्हते. पण माझे कामच माझ्यासाठी व्यायाम होते. मात्र, टेलिव्हिजन तुमच्याकडून सतत काम करण्याची मागणी करते.” असे त्या म्हणाल्या. त्यांना टीव्ही सीरियलसाठी पहाटे लवकर शूटिंगला जावे लागायचे आणि काम रात्री उशिरापर्यंत चालायचे. त्यामुळे स्वतःच्या व्यायामासाठी, आरामासाठी आणि साधे श्वास घेण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. यामुळे त्यांनी कामाची गती कमी केली आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्याचे थांबवले असल्याचा खुलासा त्यांनी केला. रोहिणी हट्टंगडी यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील शिस्तीच्या कमतरतेवरही आपली नाराजी व्यक्त केली. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, अनेकदा अखेरच्या क्षणी कॉल यायचे. जर एखाद्या सीनमध्ये अचानक बदल झाला किंवा नवीन सीन जोडला गेला, तर येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जाई, यामुळे मला खूप त्रास झाला. त्यामुळेच मी ठरवले की, मी यापुढे अशा पद्धतीने काम करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, रोहिणी हट्टंगडी सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांची या मालिकेत एंन्ट्री झाली. रोहिणी हट्टंगडी यांनी केलेल्या खुलाशांमुळे मालिका विश्वातील काम करण्याच्या प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. हेही वाचा : अहान-अनित पुन्हा एकत्र! स्टेजवर रोमँटिक डान्स; व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांच्या कमेंट्सने वेधले लक्ष