Rohit Pawar Tweet : राज्यातील २९ महापालिकांचे निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर सोमवारी १५ डिसेंबर या दिवशी राज्य निवडणूक आयागाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. महाविकास आघाडीला आपले अस्तित्व सिद्ध करण्याची तर महायुतीला सत्ता कायम राखण्याचे आव्हान असणार आहे. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून ट्वीट करत एक वेगळीच शंका उपस्थित केली आहे. कालचा दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले असे रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि सर्व झाल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या असे म्हणायचे का? असा सवाल रोहित पवारांनी ट्वीटमध्ये केला आहे. तसेच निवडणूक आयागोच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका करत कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं, असा आरोप केला आहे. यामुळे महापालिका निवडणुकांच्या काळात पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला धारेवर धरत आरोप करण्याकडे विरोधकांचा कल असल्याचे यावरून दिसत आहे. खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 16, 2025 रोहित पवार यांचे ट्वीट खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या, असे म्हणायचे का? हा सर्व घटनाक्रम पहिल्यानंतर नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं. लोकशाहीची अशी गळचेपी होताना मात्र आम्ही अनेक कारवाया होऊन देखील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, मात्र अशा एकाधिकारशाहीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. बाळासाहेब थोरांताचाही गंभीर आरोप यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आयोगाचा कारभार ‘रिमोट कंट्रोल’द्वारे चालवला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी जशीच्या तशी स्वीकारणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. हेही वाचा : भारताचे जॉर्डनसोबत ५ महत्वपूर्ण करार ; पंतप्रधान मोदी आज इथिओपियाला रवाना होणार