Beed : दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे एक मोठी दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णू सुदे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी कशी घडली घटना? निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, २२ नोव्हेंबरच्या दिवशी परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी ते जात असताना तेलगाव-धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती. त्यांच्या ताफ्यातील वाहनाने जोरदार धडक दिल्याने या धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे (३५) आणि दोन लहान मुली रागिणी (९) व अक्षरा (६) गंभीर जखमी झाले होते. हा अपघात इतकी भीषण होता की दुचाकीवरून चार जण थेट रस्त्यावर फेकले गेले. दोन निष्पाप मुली आईला पोरक्या स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना धारून येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले होते. मात्र, कुसुम सुदे यांची स्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या हॅास्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, त्याना गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांची उपाचार दरम्यान प्राणज्योत आज मालवली. या एका घटनेने एका क्षणात होत्याच नव्हतं झाले असून, दोन निष्पाप मुली आपल्या आईला पोरक्या झाल्या आहेत. या हृदयद्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे उपस्थित करण्यात येत आहे. हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारच्या निवडणूक आरक्षणावरील भूमिकेवर नाराजी; कोर्टात नेमकं काय घडलं?