Baroda vs Hyderabad match five centuries : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये बडोदा आणि हैदराबाद यांच्यात एक असा सामना खेळला गेला, ज्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून तब्बल पाच शतके ठोकली. लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात पाच शतके होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बडोद्याचा ४१७ धावांचा डोंगर – प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाने निर्धारित ५० षटकांत ४१७ धावांचा विशाल धावसंख्या उभारली. बडोद्याची सुरुवातच धडाकेबाज झाली. सलामीवीर नित्या पंड्या (१२२ धावा) आणि अमित पासी (१२७ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी २३० धावांची भक्कम भागीदारी केली. अमितने अवघ्या ९३ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह ही खेळी सजवली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार क्रुणाल पंड्या यानेही हैदराबादच्या गोलंदाजांची कंबर कसली. क्रुणालने अवघ्या ६३ चेंडूत १८ चौकार आणि एका षटकारासह १०९ धावांची झंझावाती खेळी केली. या तिघांच्या शतकांमुळे बडोद्याला ४०० चा टप्पा ओलांडता आला. हेही वाचा – Mustafizur Rahman : राजकीय तणावाच्या खेळपट्टीवर IPL चा पेच; मुस्तफिजूरच्या सहभागावरून BCCI च्या भूमिकेवर चाहते संतापले हैदराबादचा झुंजार लढा; पण ३० धावांनी विजय हुकला – ४१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघही मागे राहिला नाही. हैदराबादकडून प्रग्नाय रेड्डी (११३ धावा)आणि अभिरथ रेड्डी (१३० धावा) यांनी शानदार शतके झळकावून विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. अभिरथने ९० चेंडूत १३० धावांची आक्रमक खेळी केली. मात्र, हे दोन्ही खेळाडू मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने हैदराबादचा डाव ३८० धावांवर आटोपला. बडोद्याने हा सामना ३० धावांनी जिंकला. हेही वाचा – Sarfaraz Khan : ‘सर्फराझची उपेक्षा होणे लाजिरवाणे!’ भारताचा माजी क्रिकेटपटू टीम मॅनेजमेंटवर संतापला लिस्ट-ए क्रिकेटमधील नवा विश्वविक्रम – यापूर्वी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये (५० षटकांचे मर्यादित सामने) कोणत्याही एका सामन्यात पाच शतके नोंदवली गेली नव्हती. एकाच सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी केलेल्या या विस्फोटक खेळीमुळे हा सामना इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे.