परळी : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वेगवेगळ्या आघाड्या, युत्या झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीत देखील काहीसे असेच चित्र आहे. अंबरनाथमध्ये तर भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली तर अकोटमध्ये भाजपने चक्क ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सोबत युती केली. या दोन्ही युतींच्या राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. या युतीमुळे भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. यामुळे राजकारण चांगलेच तापले असतनाच आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या पाऊलावर पाऊल टाकले आहे. शिंदे आणि अजितदादांची एमआयएमसोबत युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळ नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली असून परळी नगरपरिषद निवडणुकीनंतर आता नवीन समीकरण पहायला मिळत आहे. या निर्णयाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. परळी नगरपरिषदेत गटनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्यानगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मित्रपक्ष, अपक्ष – 2 अशा 24 जणांचा समावेश आहे. तसेच या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश आहे. उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे सेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. या युतीवर आता विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. उबाठा गटाचे नेते माजी विधानपरिषद सदस्य अंबादास दानवे यांनी शिवसेना- राष्ट्रवादी- एमआयएम युतीवर जोरदार टीका केली आहे. एक्सवरून ट्वीट करत त्यांनी हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? असा संतप्त सवाल विचारला आहे. एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या ‘बंड’ आणि ‘तत्त्वांच्या’ गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट ‘एमआयएम-वासी’ झालात? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच… — Ambadas Danve (@iambadasdanve) January 9, 2026 नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे? एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या ‘बंड’ आणि ‘तत्त्वांच्या’ गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट ‘एमआयएम-वासी’ झालात? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या ‘सत्तेच्या संसाराचा’ चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक, अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. हेही वाचा : इराणविषयी नेमका प्लॅन काय? ; स्वतः खुलासा करत ट्रम्प यांनी दिला इराण सरकारला गंभीर इशारा