Sanjay Raut : राज्यातील राजकारण सध्या महापालिका निवडणुकांमुळे चांगलेच तापले आहे. मुंबईत ठाकरे बंधू या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ४ जानेवारीला मुंबई निवडणुकीसाठी ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्तरित्या शिवसेना भवनातून वचननामा जाहीर करणार आहेत. याबाबत उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. तसेच संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘महाराष्ट्रातील सगळे गुंड अजित पवार यांच्या पक्षात गेलेले आहेत. तुम्ही कोणत्याही गुंडाचे नाव घ्या, त्याचे संदर्भ द्या, सगळे अजित पवार यांच्या पक्षात आहे,’ असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपामुळे राजकारण तापले असून संजय राऊत यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे. संजय राऊत यांनी निवडून यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. केंद्रीय आयुक्त आणि राज्याचे आयुक्त यांच्यावर देखील राऊतांनी टीका केली आहे. निवडणूक अधिकारी धमक्या देत असल्याचा आरोप उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला असून, त्यांनी केलेला दावा सत्य असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. यामुळे आता दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांमुळे अनेक प्रश्न उपस्थित यानिमित्ताने करण्यात आले आहेत. ‘ही स्पर्धा मिंधे गट आणि भारतीय जनता पार्टीत आहे. निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होत आहे. राज्याच्या आयुक्त्यांचे नाव दिनेश वाघमारे आहेत, त्यांनी नावाला जागावे. वाघमाऱ्यांनी निदान लांडग्यांना तरी मारावे,’ असो खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवाय त्यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त यांनी देखील धारेवर धरत चोकलिंगम त्यांना सामील आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला आहे पालकमंत्र्यांकडून दबाव ? भारतीय जनता पार्टीला कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीआधीच तीन जागांवर बिनविरोध विजय मिळविण्यात यश आले आहे. यावर भाष्य करताना संजय राऊतांनी उमेदवारांना धमक्या दिल्या गेल्या असल्याचा आरोप केला आहे. हे सगळेकडे झाले असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यावर पालकमंत्र्यांकडून दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक दावा केला आहे. ‘तुम्ही याला लोकशाही आणि निवडणूक म्हणता महाराष्ट्रात अशा प्रकारचे वातावरण कधीच निर्माण झाले नव्हते,’ अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. मिंधे, भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांनी हे सुरू केले आहे, असे देखील राऊत म्हणाले आहेत. कल्याण डोंबवलीत उमेदवारांना धमक्या आल्या. या धमक्यांना भीक घालणारे आम्ही नव्हे, आम्ही तुमच्या छाताडावरती उभे राहून भगवा फडकवू, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी हे उद्योग सुरू केलेले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. २० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात येणार येत्या ४ जानेवारीला मनसे प्रमुख राज ठाकरे २० वर्षांनंतर शिवसेना भवनात येणार आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीचा संयुक्त वचननामा प्रकाशित केला जाणार आहे. त्यांसदर्भात काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. हेही वाचा : Rinku Rajguru: ‘राजसा जवळी जरा बसा!’ रिंकू राजगुरूची जबरदस्त लावणी; म्हणाली, “फक्त दोन तासांत….”