पुणे – पुणे शहरातील कोंढवा भागात भिंत कोसळुन 15 जण दगावले आणि 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेला बिल्डरच जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार ‘महादेव बाबर’ यांनी केला आहे.
दुर्घटना झाल्याचे कळताच बाबर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, निष्पाप लोकांचा या घटनेत नाहक जीव गेला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या बिल्डरवर कठोर कारवाई केली झालीच पाहिजे अशी मागणी बाबर यांनी केली आहे. तसेच जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.