मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत असून, अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. दरम्यान, किरिड सोमय्यांच्या या आरोपाला आणि टीकेला आता शिवसेनाकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
“केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.” असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत… “कालपासून जे काही घडत आहे किंवा घडवलं जात आहे ते विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आरोप करुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणं हा गेल्या काही दिवसांपासून विरोक्षी पक्षाकडून उपक्रम राबवला जात आहे.” असं राऊत म्हणाले.
‘आरोप करणाऱ्यांवर काल जी काही कारवाई झाली अथवा करण्यात आली ती गृहमंत्रायलने केली आहे. त्यामुळे या कारवाईत आकस आणि सूड या शब्दांचा वापर करू नका. या सर्व प्रकरणाची मी पूर्ण माहिती घेतली असून
गृहमंत्रालयाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न निर्माण होईल असं वाटलं. त्यातून ही कारवाई झाली असून यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाहीत.’ असं संजय राऊत म्हणाले.