सोलापूर – केसीआर पंढरपूरमध्ये आले आहेत. त्यांनी तिथलं पावित्र्य राखलं जाईल, याची काळजी घ्यावी. पण काल आपण पाहिलं की केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे अत्यंत चुकीचं आहे. पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. असं रामदास आठवले त्यांना खायचे असेल तर त्यांनी तेलंगणा मध्ये जाऊन मटण खावं. एकादशी तोंडावर असताना खाणं, हा अपमान आहे. असं म्हणत आठवले यांनी टीका केली आहे. दरम्यान,सोलापुरात केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत आखल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अशी टीका राज्यातील राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. दरम्यान, आज केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देत नेत्यांना खोचक सवाल देखील केला आहे.