पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले आहे. यानंतर त्यांनी सरकोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात हजेरी लावणार आहेत. दरम्यान, यावेळी भगीरथ भालके यांनी बीआरएस म्हणजे भारत राष्ट्र समितीमध्ये होणार जाहीर प्रवेश करणार आहेत
सभेच्या आधी दिवंगत आमदार भारत भालके यांच्या समाधीचे केसीआर दर्शन घेऊन अभिवादन करणार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.अभिजीत पाटील यांनी पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी तर्फे विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याचे संकेत पवारांनी दिले होते. तेव्हापासून भगीरथ भालके नाराज होते.
बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात आपले हातपाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. त्यांना त्यात हळूहळू यश येत असून ठिकठिकाणचे कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या गळाला लागत आहेत. या पक्षाने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठी जाहीरात बाजीही केली आहे. त्यांच्या अबकी बार किसान सरकार या टॅग लाईन खाली सुरू झालेल्या जाहीरातबाजीने राजकीय क्षेत्रात मोठेच कुतुहल निर्माण झाले आहे.
दरम्यान, सरकोली भागात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात भगीरथ भालके हे त्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. भगीरथ यांनी भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात विधानसभेची पोट निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती.