Karan Johar : फॅशन विश्वातील सर्वात मोठ्या ‘मेट गाला’ (Met Gala2026) इव्हेंटच्या भव्य कार्यक्रमात जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, यावर्षी बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर यांनी मेट गालाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले. यावेळी त्यांनी डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता, जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. Karan Johar यावर्षी मेट गालामध्ये ‘फॅशन आर्ट’ ही थीम होती. करण जोहरचा हा मेट गाला आउटफिट महान चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या पेंटिंग्सपासून प्रेरित होता. हा पोशाख हाताने केलेले पेंटिंग, थ्री-डी स्कल्प्टिंग, क्विल्टिंग तंत्रज्ञान आणि अतिशय बारीक पारंपारिक भरतकामाने तयार करण्यात आला होता. (Karan Johar) या पोशाखात राजा रवि वर्मा यांच्या काही अत्यंत प्रसिद्ध चित्रांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये ‘हंस दमयंती’, ‘कादंबरी’ आणि ‘अर्जुन-सुभद्रा’ यांचा समावेश आहे. नेटकऱ्यांनी करण जोहरच्या लूकला पसंती दर्शवली आहे. Meera Borwankar : मीरा बोरवणकरांची राज्य महिला आयोग अध्यक्षपदी निवड? व्हायरल बातमीचे सत्य अखेर समोर करणने हा खास लूक निवडण्यामागचे कारणही स्पष्ट केले. करणने इंस्टाग्रामवर लिहिले की, “राजा रवि वर्मा यांची कला मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे, कारण त्यांची चित्रे थेट भावनांचे दर्शन घडवतात आणि एक चित्रपट निर्माता म्हणून मी देखील सिनेमात हेच करण्याचा प्रयत्न करतो.” हा विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने मित्र मनीष मल्होत्रा याचे आभार मानले. तसेच भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर सादर करण्याची जी कला मनीषकडे आहे ती अतुलनीय असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले. Karan Johar Thalassemia: “थॅलेसेमिया अलर्ट: वेळेत ओळख नाही तर आयुष्यभर रक्त चढवावं लागू शकतं!” करणने मनीषचे कौतुक करताना म्हटले की, भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर सादर करण्याची जी कला मनीषकडे आहे ती अतुलनीय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला ग्लोबल स्तरावर हाय एँड फॅशनसह घेऊन जाणं ही एक कलाच आहे. या कलेसाठी मला एका कॅनव्हास असल्याचं दर्शवलंत त्यासाठी खूप आभार” कोण होते राजा रवि वर्मा? १९ व्या शतकातील महान भारतीय चित्रकार राजा रवि वर्मा यांना आधुनिक भारतीय कलेचे जनक मानले जाते. त्यांनी युरोपियन पेंटिंग तंत्राचा वापर भारतीय विषयांवर केला. त्यांच्या कलेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देवी-देवतांना पहिल्यांदा मानवी रूपात चित्रित केले. त्यांच्या चित्रांमुळेच हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा घराघरात पोहोचल्या आणि एक सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. ऑईल पेंटिंग आणि पाश्चात्य तंत्राचा वापर करून त्यांनी भारतीय संस्कृती कॅनव्हासवर उतरवली, जी आजही भारतीय कलेची ओळख मानली जाते. Karan Johar हेही वाचा: Santosh Nair : मल्याळम चित्रपटसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघाती निधन, पत्नीची प्रकृती चिंताजनक