बंगळुरू – मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची पातळी खालावली आहे. सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडून त्यांनी आता बेरोजगारी आणि गरिबीकडेही लक्ष द्यायला हवे, असे मत कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.
मोदींपूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने अशी भूमिका घेतली नव्हती. मोदी सरकार बुलेट ट्रेनवर खर्च करण्यास तयार आहे; पण गरिबांसाठी पैसे खर्च करायला तयार नाही, असे सिब्बल म्हणाले. भ्रष्टाचार रोखण्याबाबत मोदी यांनी केलेल्या आश्वासनांबाबतही सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऑपरेशन लोटसचा उल्लेख करून ते म्हणाले, देश लुबाडून नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी देशाबाहेर पळ काढला. असा चौकीदार आपल्याला खरेच हवा आहे का, असे ते म्हणाले.