सलमान खानच्या “राधे’वर टीका करणाऱ्या कमाल आर खानवर जोरदार टीका व्हायला लागली आहे. या टीकेमुळा कमाल खानने आता निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याना आता एम एफ हुसैन यांच्याप्रमाणे देश सोडून जाण्याचा इशारा दिला आहे.
बॉलिवूडमधील लोक त्यांचा छळ करीत आहेत आणि कायदेशीर खटल्याचा सामना करणे टाळण्यासाठी आपण कायमचे भारत सोडून जाऊ शकतो असे त्याने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘मी चित्रपटांचे समिक्षण थांबवण्याच्या अगदी जवळ होतो, पण पुन्हा मी खूप दूर गेलो आहे.
आणि मला वाटते, मी कायमचा खूप दूर गेलो आहे, कारण संघर्ष करण्याचे माझे वय राहिलेले नाही. पण एकदा मी कायमचा भारत सोडल्यानंतर कोणताही कायदा मला चित्रपटांच्या समिक्षणापासून रोखू शकत नाही असे त्याने म्हटले आहे.
जेंव्हा मी भारतात येइन तेंव्हा मला कोर्टापासून रोखले जाऊ शकेल, असे त्याने म्हटले आहे. सलमानच्या “राधे’वर टीका केल्यावर तो आता चांगलाच घाबरला आहे, असे वाटायला लागले आहे.