Hrithik Roshan : “कहो ना प्यार है”ला २५ वर्ष पूर्ण; सिनेमा थिएटर्समध्ये री-रीलीज; हृतिक म्हणतो…..तेव्हापासून आतापर्यंत काय बदललं?

‘कहो ना प्यार है’ या हृतिक आणि आमिषा यांच्या ब्लॅाकबस्टर सिनेमाला चित्रपटगृहात री-रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाने हृतिकला बॅालीवूड इंडस्ट्रीमध्ये मानाचा स्थान मिळवून दिलं. आज तो इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या बरोबरच या सिनेमामुळे अभिनेत्री आमिषा पटेल ही देखील रातोरात स्टार झाली. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अभिनेता हृतिक रोशनला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतेच त्याने कहो ना प्यार है या सिनेमाबद्दलच्या त्याच्या काही नोट्स इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. या सिनेमाने त्याकाळी बॅाक्स अॅाफिसवर सर्वांत मोठी कमाई केली होती.
या नोट्समध्ये चित्रपटाची दृश्ये, अभिनय आणि गाणी लिहिली आहेत. या चित्रपटानंतर हृतिकच्या अभिनयासोबतच त्याच्या डान्स मूव्हजलाही खूप पसंती प्रेक्षकांनी दिली. प्रेक्षकांना हा सिनेमा इतका आवडला की तो बॅाक्स अॅाफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमाने त्याकाळी अनेक विक्रम देखील मोडले असल्याचे सांगण्यात येते. हृतिक रोशनचा हा सिनेमा त्याचे वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता.
तेव्हापासून आतापर्यंत काय बदललं ?
हृतिकने त्याच्या शेअर केलेल्या पोस्टसह कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा पहिला सिनेमा ‘कहो ना प्यार है’ साठी अभिनेता म्हणून तयारी करत असताना 27 वर्षांपूर्वीच्या माझ्या नोट्स. मला आठवते की मी किती नर्व्हस होतो, आजही सिनेमा सुरू करताना मी नर्व्हस आहे. “मला हे शेअर करायला लाज वाटेल, पण इंडस्ट्रीत 25 वर्षांनंतर, मला नर्व्हस वाटते”, असे त्याने लिहिले आहे. तसेच यासोबच त्याने पुढे लिहिले की, तेव्हापासून आतापर्यंत काय बदलले? मी ही पानं पाहतो आणि मला असे वाटते काहीही नाही. चांगली गोष्ट? वाईट गोष्ट? हे असेच आहे, बाकी आहे ती मधली प्रक्रिया. ‘कहो ना प्यार है’ ने 25 वर्षे पूर्ण केली आहेत. या दरम्यान मला जर काही सेलिब्रेट करायचं असेल तर ते रफ कॉपीच्या मागे अशा काही गोष्टी तयार केल्या आहेत, असे देखील त्याने लिहिले आहे.





