पाचपेक्षा अधिक लोक न जमविण्याचे आवाहन
पुणे – येत्या काही दिवसात सण-जयंती मोठ्या प्रमाणात आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या सण-जयंती गर्दी करून साजऱ्या करू नयेत. परवानगीशिवाय मिरवणूका काढू नये आणि पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमवू नयेत, असे आवाहन पुण्याचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
6 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती आहे. 8 एप्रिल रोजी हनुमान जयंती आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे. 10 एप्रिल रोजी गुडफ्रायडे, 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंती, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या पार्श्वभूमीवर शिसवे यांनी हे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. शिसवे यांनी हे आवाहन केले आहे. शस्त्रे वापरू नयेत. गर्दी करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 नुसार कारवाई केली जाईल. संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र असणार आहे.