Jitendra Awhad on Rahul narvekar Ncp Disqualification Case – राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अपात्रतेचा निकाल जाहीर केला आहे. यात त्यांनी मुळ पक्ष अजित गटाचा असल्याचा निर्वाळा दिला. यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे ‘कायद्याची पायमल्ली’ अशा शब्दात संताप व्यक्त केला.
आव्हाड म्हणाले की, कायद्याची पायमल्ली कशी करावी, आपल्या सोईचा निकाल कसा द्यावा याचे ट्युशन नार्वेकर देऊ शकतात. त्यांना आता देशाच्या कायद्याचे प्रमुख केले पाहिजे, देशाचा कायदाच बदलण्याचा अधिकार दिला पाहिजे, असा खोचक टोला देखील लगावला. | Jitendra Awhad on Rahul narvekar Ncp Disqualification Case
ज्याप्रमाणे धृतराष्ट्र डोळ्याला पट्टी बांधून सर्व काही वाचत होता. त्याचप्रमाणे अगदी नार्वेकरांनी डोळ्याला पट्टी लावून निकालाचे वाचन केले आहे. आम्हाला पात्र करून त्यांनी आम्हाला दिलासा दिला असे म्हणता येणार नाही. पण राज्यात जे गैर चालू आहे. ते अत्यंत वाईट आहे. हा निकालाच हास्यास्पद आहे. शेड्युलड १० ची त्यांनी थट्टा केली आहे, असा घणाघात देखील आव्हाड यांनी केला. | Jitendra Awhad on Rahul narvekar Ncp Disqualification Case
मग वाद नेमका होते कुठे?
दोन्ही गटांकडून अध्यक्षपदाच्या आव्हान देणाऱ्या याचिका आल्या आहेत. पण शरद पवार यांची अध्यक्षपदाची निवड ही १ सप्टेंबर २०२२ रोजी झाली होती. १ सप्टेंबर २०२३ पासून ते ३० जून २०२३ या कालावधीत त्यांना चॅलेंज झालेच नव्हते. पण २९ जूनपर्यंत पक्षात वाद नव्हता, असे राहुल नार्वेकर म्हणतात. पण निवडणूक आयोग काय म्हणते हे समजत नाही. मग वाद होता कुठे? असा माझा प्रश्न आहे, असेही आव्हाड म्हणाले. | Jitendra Awhad on Rahul narvekar Ncp Disqualification Case