Jitan Ram Manjhi : बिहार विधानसभेतील वातावरण सध्या चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता त्यांनी माही मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून रामायण सुरु झाले आहे.कारण त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आज माजी मुख्यमंत्री आणि HAM पक्षाचे नेते जीतन राम मांझी बिहार विधानसभा संकुलात धरणे धरले. त्यांच्यासह भाजप नेत्यांनीही आंदोलन केले.
जीतनराम मांझी यांनी त्यांच्या विधानाच्या निषेधार्थ शुक्रवारी आंदोलन केले. यादरम्यान मांझी म्हणाले की, नितीश कुमार यांना आजकाल विषारी पदार्थ खायला दिले जात आहेत, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तसेच नितीशकुमार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
नितीशकुमार यांनी अशी भाषा वापरायला नको होती. त्याचे संस्कार खालच्या पातळीवर असून त्यांनी एकेरी उल्लेख करायला नको होता. तसेच नितीश कुमार यांना अशी भाषा शोभून दिसत नाही अशा शब्दात नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन केले आहे.
बिहारमधील जातीच्या जनगणनेवर जीतन राम मांझी यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर नितीश कुमार त्यांच्यावर आक्रमक झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गुरुवारी विधानसभेच्या कामकाजादरम्यान जीतनराम मांझी यांच्यावर भडकले. त्यांच्याविषयी बोलताना नितीशकुमार यांनी “माझ्या मूर्खपणामुळेच जीतनराम मांझी मुख्यमंत्री झाले,” असे मुख्यमंत्री म्हणाले. आज त्यांना राज्यपाल व्हायचे आहे, म्हणून ते फालतू बोलतात.