BJP 12MLAs Suspension | विधानसभेत झालेला ‘तो’ प्रकार न विसरण्यासारखा – जयंत पाटील
Updated On:

मुंबई – निलंबनाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारचा नसून विधानसभेत जी घटना घडली त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर विधानसभा अध्यक्ष व विधानसभा कार्यालय अभ्यास करून निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया 12 आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
विधानसभेत झालेला हा प्रकार न विसरण्यासारखा आहे. आम्ही सर्वजण त्यावेळी विधानसभेत उपस्थित होतो. हा प्रकार इतक्या टोकाचा होता की त्याची प्रतिक्रिया म्हणूनच निलंबनाचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला, असेही जयंत पाटील म्हणाले.




