Jayant Patil On Ajit Pawar – सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास होत नाही. हे खर आहे, सत्ता असल्याशिवाय विकास करता येत नाही. पण विकासाला तत्त्वांची झालर असली पाहीजे. विकासाला काही धोरण असले पाहिजे. अजित पवार यांचे पत्र महाराष्ट्राच्या जनतेला आहे. । Jayant Patil On Ajit Pawar
पण त्यात ते म्हणाले, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखी माझी कामाची शैली आहे. आमचे त्याबाबत दुमत नाही. पण यांवर दुसऱ्यांची हरकत येऊ शकते. आपली तुलना कुणाशी करायची? याचे भान तिकडे गेल्यावर ठेवण्याची गरज आहे, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण भाषणात कुठेही शाहू – फुले – आंबेडकर यांचे नाव घेतलेले नाही. योजनांच्या नावांपलीकडे कुठेही उल्लेख नव्हता. विचार सोडून जर विकास होत असेल तर त्याला फारसा अर्थ नाही.
तरुणांच्या हाताला काम कसे देणार याचाही यात उल्लेख नव्हता. बुलेट ट्रेनचा फायदा अहमदाबाद व गुजरातला होणार हे जगजाहीर आहे तरी आपण सहन करत आहोत. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी सरकारने एक चकार शब्द काढला नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर आहे हे या बजेटमधून कुठेच दिसत नाही.
रुग्णवाहिकेसाठी 108 ची योजना सुरू असताना नवी योजना कशासाठी? या सर्व गोष्टी आपण कुठेतरी दुर्लक्षीत करत आहोत. वाढवण बंदर करत असताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करा. विकासाला काही धोरण व काही तत्व असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. । Jayant Patil On Ajit Pawar