MLA Mangesh Chavan : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच ठिकाणी वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. जागावाटपाबाबत महायुतीमध्ये संघर्ष अटळ आहे. अशी सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती आहे. या साऱ्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन ज्या जिल्ह्यातून येतात, तिथेल राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्याच सरकारला घराचा आहेर दिला आहे. त्यांनी केलेल्या भाजपवरील टीकेला आता भाजप आमदार मंगेश चव्हाण जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महायुतीच्या काळात आमदारांना एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा मिळालेली नाही, असा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केला होता. तसेच भाजपवर त्यांनी टीका केली होती. दोन टर्मपासून विरोधक गुपचूप किंवा थेट उमेदवार देत मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनता आणि शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. भाजपाच्या काही नेत्यांनी पाठीत खंजीर खूप असणार असाल तर, अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा समोरासमोर लढणं कधीही बरे, असे म्हणत आमदार किशोर पाटील शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले. हेही वाचा : PCMC Election : निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार यादीचा कार्यक्रम बदलला; आता ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध किशोर पाटील यांना आव्हान त्यांनी केलेल्या विधानानंतर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. हा संघर्ष थेट सेना विरुद्ध भाजप असा उफाळून आला असल्याचे दिसते. बुधवारी पार पडलेल्या मेळाव्यात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मी पाचोरा मतदारसंघात लक्ष घातले आहे. आमदार पाटील यांनी चाळीसगाव नगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा. तसे केल्यास मी पाचोर्यात येऊन त्यांचा सत्कार करीन, असे आव्हान किशोर पाटील यांना चव्हाण यांनी दिले आहे. आम्हाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही त्यामुळे ऐन नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या काळात येथील राजकारणात सेना विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. आमदारांचा पगार काय? ते बोलतात काय? आता तर ते थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. तलाठी आणि तहसीलदारांना दम देऊ लागले आहेत, असा आरोपही मंगेश चव्हाण यांनी केले. पालिका निवडणुकीत आम्हाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जे डोक्यात घेतात ते पूर्ण करतात, असा इशाराही मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. हेही वाचा : बिहारच्या पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदान सुरू