S. Jaishankar – पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील कोंडी फोडण्यासाठी भारताने राजनैतिक प्रयत्न तीव्र केले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर( S. Jaishankar) यांनी गुरुवारी रात्री उशीरा त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. संकट सुरू झाल्यापासून दोन्ही नेत्यांमधील ही चौथी चर्चा आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंना सध्या २८ व्यापारी जहाजे अडकून पडली आहेत. यामध्ये भारतीय ध्वज लावलेल्या जहाजांचाही समावेश आहे. या जहाजांना सुरक्षित मार्ग मिळवून देणे ही भारताची प्राथमिकता आहे. इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या आक्रमणांची माहिती दिली.S. Jaishankar तसेच, आत्मसंरक्षणाचा कायदेशीर अधिकार वापरण्याच्या तेहरानच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. सध्याच्या नाजूक परिस्थितीत प्रादेशिक आणि जागतिक स्थिरता राखण्यासाठी ब्रिक्स (Brics) या मंचाने विधायक भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे अराघची यांनी नमूद केले. S. Jaishankar द्विपक्षीय संबंधांसह बहुपक्षीय सहकार्यावरही या चर्चेत भर देण्यात आला. २८ फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भारताचे महत्त्व : S. Jaishanka भारत हा इराण आणि अमेरिका-इस्रायल या दोन्ही बाजूंच्या संपर्कात असलेला महत्त्वाचा देश आहे. अडकलेली जहाजे सोडवणे आणि या प्रदेशात शाश्वत सुरक्षा वातावरण निर्माण करणे यासाठी भारताची मध्यस्थी महत्त्वाची मानली जात आहे. एस. जयशंकर यांनी यापूर्वी ५ आणि १० मार्च रोजीही अराघची यांच्याशी संवाद साधला होता, जे या विषयाचे गांभीर्य अधोरेखित करते. S. Jaishankar