BJP Operation Lotus | महानगरपालिका निवडणुकींच्या निकालानंतर आता भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवत नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने (बविआ) ७१ स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता भाजपकडून रणनीती आखली जात असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’च्या व्हायरल पोस्टमध्ये भाजप बविआचे नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असून, काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. “राजकारणात काहीही होऊ शकते,” असे सूचक विधान यात करण्यात आले. यावर आता बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला कडक शब्दात इशारा दिला आहे. हितेंद्र ठाकूर यांचा भाजपाला इशारा हितेंद्र ठाकूर म्हणाले, “लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे. आता असले धंदे करत बसलात, तर लोक तुमच्या तोंडात शेण घालतील. ही भाजपने सोडलेली निव्वळ पुडी आहे. माझा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही आणि फुटणार नाही याची मला खात्री आहे.” BJP Operation Lotus | याशिवाय त्यांनी पुढील कामांबाबत सांगितले की, “आम्ही अनधिकृत बांधकामांवर अंकुश आणू. पिण्याचे पाणी देताना ती इमारत अधिकृत आहे की अनधिकृत हे पाहणार नाही, सर्वांना पाणी देऊ. तसेच पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी विशेष उपाययोजना करून जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू,” असेही त्यांनी सांगितले. BJP Operation Lotus | दरम्यान, वसई विरारमध्ये पार पडलेल्या ११५ जागांच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने वर्चस्व गाजवले आहे. बहुजन विकास आघाडीला ७० जागा मिळाल्या असून काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. तर भाजपनं ४३ जागांवर विजय मिळवला आहे. शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. BJP Operation Lotus | शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये बंद BJP Operation Lotus | दुसरीकडे, मुंबई महापालिकेच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी उचलेलं पाऊल. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत, शिवसेनेच्या नवनिर्वाचित 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. पक्षातील कोणताही नगरसेवक फुटू नये, तसेच सत्तास्थापनेदरम्यान एकसंघ राहावे, यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या नगरसेवकांची बेरीज केल्याशिवाय, भाजपप्रणित महायुतीला 114 ची मॅजिक फिगर गाठणं शक्य नाही. महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाकरे बंधू शिवसेनेचे नगरसेवक फोडू शकतात, अशी भीती एकनाथ शिंदेंना सतावत असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. BJP Operation Lotus | हेही वाचा : “जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्या”; बड्या नेत्याची निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी