Iran-India Friendship: मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारतासह काही ‘मित्र देशां’च्या जहाजांना हॉर्मूज सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी भारताकडे येणाऱ्या दोन LPG (स्वयंपाक गॅस) टँकर्सनी हॉर्मूज सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली. ‘BW ELM’ आणि ‘BW TYR’ अशी या टँकर्सची नावे असून ते आता ओमानच्या आखाताकडे पुढे सरकत आहेत. 90 हजार टन LPGची वाहतूक – Iran-India Friendship या दोन्ही भारतीय ध्वजांकित टँकर्समध्ये मिळून 90 हजार टनांहून अधिक LPG आहे. हे टँकर्स सुमारे 27 किमी प्रतितास वेगाने एकमेकांच्या जवळून प्रवास करत सामुद्रधुनीबाहेर पडले. दरम्यान, आणखी पाच भारतीय टँकर्स सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या किनाऱ्याजवळ थांबले असून त्यांना हॉर्मूज मार्ग पार करण्यासाठी परवानगीची प्रतीक्षा आहे. हे टँकर्स मुख्यतः कच्चे तेल वाहून नेत आहेत. 20 भारतीय जहाजे अडकलेली – Iran-India Friendship एकूण 20 भारतीय जहाजे अद्याप आखातात अडकलेली आहेत. त्यातील काही रिकाम्या जहाजांवर भारत LPG लोड करण्याचे कामही करत असल्याची माहिती आहे. Iran-India Friendship: आणखी दोन LPG जहाजे सोडली; ‘मित्र देश’ म्हणून इराणकडून भारतीय टँकर्सना ‘हॉर्मूज’ मार्ग खुला इराणचे ‘मित्र देश’ धोरण – Iran-India Friendship इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी स्पष्ट केले की चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या ‘मित्र देशां’च्या जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाईल. मात्र, इराणच्या विरोधात असलेल्या देशांच्या जहाजांवर बंदी कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा – येमनकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला; हॉर्मूजनंतर आता लाल समुद्रातील व्यापारी मार्ग धोक्यात? यापूर्वीही काही जहाजे आली – गेल्या महिनाभरात ‘Jag Vasant’, ‘Pine Gas’, ‘Shivalik’ आणि ‘Nanda Devi’ या भारतीय जहाजांनीही हॉर्मूज सामुद्रधुनी पार केली आहे. ‘Jag Vasant’ आणि ‘Pine Gas’ या टँकर्सनी नेहमीच्या मार्गाऐवजी इराणच्या लारक आणि केशम बेटांदरम्यानचा मार्ग घेतला होता. तज्ज्ञांच्या मते, आपली ओळख स्पष्ट व्हावी यासाठी हा मार्ग निवडण्यात आला. भारतासाठी हॉर्मूजचे महत्त्व – हॉर्मूज सामुद्रधुनीतून जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक होते, तर भारताच्या सुमारे 50 टक्के ऊर्जा आयातीचा मार्ग याच ठिकाणातून जातो. मागील दोन आठवड्यांत या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने भारतात गॅस पुरवठ्यावर ताण आला होता. यामुळे घरगुती गॅस सिलिंडरची घाबरून खरेदी (पॅनिक बायिंग) झाली होती. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना तात्पुरते बंद ठेवावे लागले किंवा मेन्यू मर्यादित करावा लागला होता. आता इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिल्यामुळे येत्या काही आठवड्यांत गॅस पुरवठ्याची स्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Iran-India Friendship