बंगळुरू – राजस्थानच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्याला पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने सुरू झालेला सामना पुन्हा झालेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला. त्यामुळे राजस्थान आणि बंगळुरूच्या संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिल्याने राजस्थानचे आव्हान संपुष्टात आले आहे.
प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने निर्धारित 5 षटकांत 7 बाद 62 धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना राजस्थानच्या संघाने 3.2 षटकांत 1 बाद 41 धावांची मजल मारली असताना पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने सामना अनिर्णित घोषित केला गेला. यावेळी 63 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानने धमाकेदार सुरूवात केली. त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या षटकात 10 धावा दुसऱ्या षटकांत 12 तर, तिसऱ्या षटकांत 18 धावा वसूल करत तीन षटकांत 40 धावा केल्या.मात्र, पुन्हा चौथ्या षटकावेळी पावसाला सुरूवात झाल्याने पंचानी सामना अनिर्णित घोषित केला.
Another shower proved to be the final nail in the coffin as the match between #RCBvRR is called off.#VIVOIPL pic.twitter.com/iN9EbkaLdM
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2019
तत्पूर्वी, बंगळुरूने धमाकेदार सुरूवात केली. सलामीवीर कोहली आणि ए. बी. डिव्हीलियर्सने पहिल्या षटकांत 23 धावा वसूल करत धमाकेदार सुरूवात केली. यानंतर श्रेयस गोपालने तिसऱ्या चेंडूवर विराट तर, चौथ्या चेंडूवर डिव्हीलियर्स आणि पाचव्या चेंडूवर स्टोइनिसला बाद करत श्रेयसन हॅटट्रिक नोंदवली. श्रेयसच्या हॅटट्रिकने बंगळुरूच्या धावगतीला अचानक ब्रेक लागल्याने ते 62 धावांच करु शकले.