Shreyas Iyer Decision On Yuzvendra Chahal : आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या टप्प्यात गुणतालिकेत टॉप-२ मध्ये राहणाऱ्या पंजाब किंग्सचा विजयाचा रथ आता भरकटताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पत्करावा लागलेल्या पराभवामुळे पंजाबला सलग चौथ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवामुळे एकेकाळी प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेला पंजाबचा संघ आता दबावाखाली आला असून, त्यांच्यासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह – दिल्लीविरुद्धच्या २११ धावांच्या विशाल लक्षाचा बचाव करण्यात पंजाबला अपयश आले. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या काही निर्णयांवर टीका होत आहे, विशेषतः स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलला एकही ओव्हर न देण्याच्या निर्णयावर चाहते नाराज आहेत. सामन्यांनंतर चहलला गोलंदाजी का दिली नाही? असा प्रश्न विचारला. 🚨Punjab Kings Coach Ends Silence After Shreyas Iyer Refuses To Use Yuzvendra Chahal#SpinBowling #FastBowling #CricketUpdate #MatchAnalysis #Bahutule #CricketFans #IndianCricket #T20Cricket #GooglyMedia pic.twitter.com/Dm1eBtTN7g — googlymediatv (@googlymediatv) May 12, 2026 यावर श्रेयस अय्यर म्हणाला, “चहलला गोलंदाजी देण्याचा विचार माझ्या मनात नक्कीच आला होता. मात्र, चेंडू ज्या प्रकारे सीम होत होता आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती, ते पाहता सीमर्स विकेट काढतील असे वाटले होते. दुर्दैवाने आमची लाईन-लेन्थ चुकली आणि आम्ही दिल्लीला रोखू शकलो नाही”. हेही वाचा – Axar Patel Fined : दिल्लीच्या विजयानंतर कर्णधार अक्षर पटेलला बीसीसीआयचा दणका! मैदानातील ‘ही’ चूक पडली महागात पंजाबसाठी ‘करो या मरो’ची स्थिती – 🚨 VIRENDAR SEHWAG SLAPS SHREYAS IYER CAPTAINCY 🚨 Virendar Sehwag Said 🗣️, “You’re making Yuzvendra Chahal, Punjab’s main bowler, field for all 20 overs but not giving him even a single over to bowl. If a match-winner like Chahal doesn’t bowl, then it becomes really difficult… pic.twitter.com/nM1UZIoViJ — Tollymasti (@tollymasti) May 12, 2026 धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोरिंग सामन्यात दिल्लीने अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलरच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर एक षटक राखून विजय मिळवला. या विजयामुळे दिल्लीच्या प्लेऑफ्सच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दुसरीकडे, पंजाबला आता प्लेऑफ्समध्ये स्थान निश्चित करण्यासाठी उरलेल्या तीन सामन्यांपैकी किमान दोन सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. आता पंजाबचा संघ पुढील सामन्यांत कशी पुनरागमन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.