विशाखापट्टणम : गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा आंध्र प्रदेशकडे ओढा वाढू लागला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली या राज्याने एक विक्रम प्रस्थापित करत फक्त एका दिवसात 35 प्रमुख सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. यामुळे राज्यात 3.65 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून 1.26 लाख नवीन नोकर्या निर्माण होणार आहेत. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांनी या करारांमध्ये उत्साहाने भाग घेतला. मुख्यमंत्री नायडू यांनी स्वतः दिवसभरात 15 बैठकांमध्ये भाग घेतला आणि राज्याला देशातील पहिले गुंतवणूक केंद्र बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. नायडू यांनी युरोपीय देशांना आंध्र प्रदेशात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण देण्यात आले. त्यांनी सांगितले की आंध्र प्रदेश जागतिक बाजारपेठेचे प्रवेशद्वार बनू शकते. मुख्यमंत्र्यांनी इटली आणि तैवानच्या राजदूतांचीही भेट घेतली. ऑटोमोबाईल्स, यंत्रसामग्री, फॅशन, ऊर्जा आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात इटलीसोबत भागीदारी करण्यावर चर्चा करण्यात आली. तैवानच्या गुंतवणूकदारांना इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. नायडू यांनी आंध्र प्रदेशात हरित ऊर्जा क्षेत्र वेगाने उदयास येत आहे आणि 1,000 किलोमीटरच्या किनारपट्टीमुळे या राज्यात भारतातील सर्वात मोठे लॉजिस्टिक्स हब बनण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विशाखापट्टणम आर्थिक क्षेत्राला जागतिक केंद्रात विकसित करण्याबाबतचा अहवाल देखील प्रकाशित केला आणि त्याच्या विकासासाठी नवीन पदांची घोषणा केली.