नारायणगाव – नारायणगावमधील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नारायणगाव ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या वतीने मंगळवारी (दि. 8) गावात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करून 14 हजार 890 नागरिकांची एका दिवसांत आरोग्याची तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय आधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.
जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य विभाग, नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या सर्वेचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता मुक्ताई मंदिर सभागृहात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व शिक्षकांना हा सर्वे कशा पद्धतीने करायचा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन स्वतःपरिसरातील काही घरांना देऊन टेम्परेचर, पल्स, ऑक्सिजन आदी तपासणी केल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तहसीलदार हनुमंत कोळेकर, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, उपसरपंच सारिका डेरे, अरिफ आत्तार, संतोष दांगट आदी उपस्थित होते. यासर्वेसाठी एकूण 98 पथके तयार करण्यात येऊन एका पथकात दोन कर्मचारी अशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. या पथकांना थर्मलगन, ऑक्सिमिटर देण्यात आले होते, त्यानुसार या पथकाद्वारे नारायणगाव मधील 5 हजार घरांपैकी साडेतीन हजार घरांचा सर्वे करण्यात आला.
- 13 पॉझिटिव्ह सापडले
दिवसभरात करण्यात आलेल्या तपासणीत 70 संशयित आढळले असून रॅपिड टेस्टमध्ये 53 पैकी 13 करोना पॉझिटीव्ह, 40 निगेटिव्ह, 13 जणांना उपचारांसाठी ओझर येथे दाखल करण्यात आले व 40 जणांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे.
नारायणगाव (ता. जुन्नर) : येथे आरोग्य तपासणी सर्वेत मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः नागरिकांच्या तपासणी केली.