मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घोटाळाप्रकरणी बीडमधील दोन कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन अधिकाऱ्यांमध्ये अंबाजोगाई आणि बीड उपविभागीत कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ आणि तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना जलयुक्त शिवार योजनेतील दोषींवर कारवाई होणार असे स्पष्ट केले आहे. भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत सरकारने कोटी निधीवर डल्ला मारल्याचे स्पष्ट निरीक्षण कॅगच्या अहवालात नोंदविले आहे. या अभियानामुळे गावागावातील पाण्याची पातळी तर वाढलीच नाही. त्यामुळे चौकशींनंतर दोषींवर कारवाई होईल असे ते म्हणाले.