मुंबई – धारावी पुर्नविकास प्रकल्प अदाणी समूहाकडे देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेनं ( thackeray group ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन केलं. या महामोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील नेते ( MVA ) आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.कोरोना काळात धारावी ( Dharavi ) सुद्धा कोरोनाशी लढली. ही धारावी अदानीला शरण जाणार का ? असा सवाल यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ( Dharavi morcha )
महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात आले आणि ‘पन्नास खोके एकदम ओके’ ही घोषणा राज्यभर पोहचली. हे खोके आता कोणी दिले हे आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल असं म्हणत ठाकरेंनी यावेळी अप्रत्यक्षपणे अदानींना टोला लगावला. आपलं चाललेलं सरकार यांनी का पाडलं याच कारण तुमच्या लक्षात आलं असेल. अस सूचक विधान उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांनी केलं. ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये आज धारावी ते अदानी ( Dharavi to adani office morcha ) यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra fadanvis ) यांच्यावर देखील निशाणा साधला.
विकास म्हणून तुम्ही सर्व काही अदाणींच्या घशात घालताय हे चालणार नाही. धारावीकरांना पाचशे फुटांचं घर मिळालंच पाहिजे. सध्याचं सरकार दलाल आहे. महानगरपालिकेच्या निवडणूक घेण्याची हिम्मत यांच्यात नाही. माझं चिन्ह आणि पक्ष तुम्ही चोराल पण माझा विश्वास कसा चोरणारा असं देखील ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना खडसावलं.
मुंबई महाराष्ट्रापासून तुटू नये यासाठी ज्या हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली ती भाजपचे जावई असलेल्या अदाणींना मुंबई हुंड्यात देण्यासाठी दिलेली नाही. आज या लढ्याची सांगता नाही तर सुरुवात झाली आहे. धारावीकर पिढ्यानपिढ्या ज्या वातावरणात राहताहेत त्या वातावरणात अदानींनी एक रात्र काढून दाखवावी. असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.