मुंबई – आयसीसी अंपायर डेव्हलपमेंट पॅनेलमध्ये भारताच्या दोन महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला पंच वृंदा राठी व तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या एन. जननी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे.
मुंबईच्या वृंदा राठी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लेवल 2 पंच परीक्षेत यश मिळविले आहे. त्या संघटनेच्या विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहतात.
त्यांनी पंच म्हणून काम करण्यापूर्वी स्कोअरर म्हणूनही काम केले आहे. राठी व जननी यांच्यापूर्वी भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांनी आयसीसीच्या सामना निरीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर खूप वर्षांनी भारताच्या महिला पंचांना आयसीसीच्या समितीत काम करण्याची संधी मिळाली आहे.