नवी दिल्ली : आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे. जर या सामन्यात भारताने बांगलादेश विरुद्ध विजय मिळवला तर भारत सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो. मात्र आजच्या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे जर पावसामुळे आजचा सामना रद्द झाला तर सेमीफायनलचे गणित कसे असणार? याबद्दल जाणून घेऊया…
सामना रद्द झाला तर…
भारत- बांगलादेश सामन्यात जर पाऊस पडला तर दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. यामुळे भारतीय संघाला फायदा होईल. तर बांगलादेशसाठी शेवटचा सामना करो किंवा मरो असा असणार आहे. भारताने एक सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर भारत सेमीफायनलमध्ये धडक मारेल. आणि भारताचा सामना रद्द झाला तर भारताचे तीन आणि बांगलादेशचा एक गुण होईल. तसेच बांगलादेशने जर भारतीय संघाला हरवलं तर भारताला शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. तरच भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल.
भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एक एक सामना जिंकला आहे. बांगलादेशविरुद्ध भारत हरला आणि ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला हरवलं तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. तसंच जर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर रन रेटच्या आधारावर कोणता संघ सेमीफायनलमध्ये जाणार हे ठरणार आहे. सुपर 8 फेरी पर्यंत भारताने जबरदस्त खेळ केला आहे. लीग स्टेजपासून आतापर्यंत भारतीय संघ अपराजित राहिला आहे.