IND vs AUS 3rd Test : रोहितने सलामीवीर म्हणूनच खेळावे, भारताच्या ‘या’ दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी दिला सल्ला….

IND vs AUS 3rd Test :- बॉर्डर-गावस्कर करंडक मालिकेच्या पाहिल्या लढतीत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पितृत्व रजेमुळे अनुपस्थित होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये यशस्वी जैस्वाल व लोकेश राहुल यांनी भारतासाठी सलामीवीराची भूमिका बजावली होती. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात या जोडीने भन्नाट फलंदाजी करताना 201 धावांची सलामी दिली होती. या लढतीत भारताने 295 धावांनी विजय मिळवला. यामुळे संघ व्यवस्थापनाने दुसऱ्या कसोटीत देखील याच जोडीकडे सलामीवीराची भूमिका दिला. त्यामुळे कर्णधार रोहित दुसऱ्या कसोटीमध्ये शर्माला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली.
दुसऱ्या कसोटीमध्ये भारताला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत रोहित शर्मा दबलेला दिसून आला. सहाव्या क्रमांकावर खेळताना रोहित शर्माने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 6 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री व सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माने सलामीलाच खेळावे असा सल्ला दिला आहे.
रवी शास्त्री म्हणाले, रोहित शर्मासाठी सलामीच योग्य आहे. त्याच जागेवर तो आक्रमकपणे व्यक्त होवू शकतो. दुसऱ्या लढतीत एकूणच त्याच्या देहबोलीवरून तो दबलेला असल्याचे दिसून आले असल्याचे शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, त्याने दुसऱ्या लढतीमध्ये धावा केल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्या परिस्थितीमध्ये तेवढ्या धावा पुरेशा आहेत, असे वाटत नसल्याचे शास्त्री म्हणाले.
पर्थ कसोटीच्या वेळेसच रोहित शर्मा पर्थ येथे पोहचला होता. या कसोटीत भारताने 295 धावांनी विजय मिळविल्यानंतर संघाच्या क्रमवारीत बदल करणे योग्य नसल्याचे सांगताना त्याने कॅनबेरा येथे झालेल्या पंतप्रधान इलेव्हन संघासोबतच्या सराव सामन्यात देखील सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. तथापि, हा निर्णय वैयक्तिकरित्या सोपा नसल्याचे कर्णधार रोहित शर्माने कबूल केले होते.
राहुल ठरला अपयशी…
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सहकारी सलामीवीर आणि शतकवीर यशस्वी जैस्वाल याच्यासोबत 201 धावांची भागीदारी करताना 26 आणि 77 धावा करणाऱ्या राहुलला दुसऱ्या सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. संधीचा फायदा उठवण्यात राहुलच्या अपयशामुळे भारताचे माजी कर्णधार गावस्कर यांनी रोहितला त्याच्या सलामीच्या स्थानावर खेळावे, असे मत गावस्कर यांनी मांडले.
IND vs AUS 2nd Test : सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडलं महागात, ICC ने केली मोठी कारवाई….
ते म्हणाले, रोहितने त्याच्या नियमित जागेवर परतले पाहिजे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये राहुल सलामीला खेळाला. त्याने पहिल्या कसोटीत 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केल्याने त्याला सलामीवीर म्हणून कायम ठेवण्यात आले. मात्र, आता त्याने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर परतावे, जेणेकरून रोहित शर्मा पुन्हा सलामीवीर म्हणून खेळू शकेल. रोहितने सुरुवातीला झटपट धावा केल्या, तर तो शतकी खेळी देखील करू शकतो, असे गावस्कर म्हणाले.





