नातेपुते – खंडाळी (ता. माळशिरस) ग्रामपंचायत करोनाच्या संकटात नागरिकांच्या पाठीशी आहे, असे मत सरपंच बाबुराव पताळे यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या वतीने 15 टक्के ग्रामनिधीतून मागासवर्गीय नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी साखर, शेंगादाणे, तेल, तुरदाळ, मुगदाळ, हरभरा दाळ, मीठ तसेच साबण, मास्क, ब्रश, चहा अशा विविध 18 वस्तूंचे एक किट तयार करून गावातील सत्तर ते ऐंशी कुटुंबांना सरपंच बाबुराव पताळे पाटील, ग्रामविकास अधिकारी मोहनराव मिटकल, पोलीस पाटील डॉ. सुभाष कटके, तंटामुक्तीचे अध्यक्ष गणपत पताळे पाटील, रणजितसिंह कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांसाठी थर्मल स्कॅन मशीन तसेच ग्रामपंचायत आवारात हॅन्डवॉशची सोय करण्यात आली आहे.
कोणाला सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, दम लागणे आदी लक्षणे असतील तर त्यांनी कृती समिती किंवा सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क करावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी साबळे, पांडुरंग किर्दकर, लक्ष्मण खंडागळे, विष्णू अवघडे, गौतम खरात यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.