बीड : बीडमध्ये बाबुराव विठ्ठल यमपूरे(५५) या शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मुलाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याने तणावातुन टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या काही नातेवाईकांनी केला आहे. तथापि, या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, यमपूरे यांनी सकाळी बीड तालुक्यातील माजरसुंबा गावाजवळील यमपूरे वस्तीत एका झाडाला गळफास घेतला. यमपूरे यांच्या अनेक नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले होते, परंतु त्यांच्या मुलाचा अर्ज तहसील कार्यालयात प्रलंबित होता. प्रमाणपत्राअभावी मुलाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्यावर विशेषतः आरक्षणाच्या लाभांवर, प्रतिकूल परिणाम होत असल्याने यमपूरे खूप तणावात होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. मृत्यूच्या संदर्भात नातेवाईकांकडून आम्हाला कोणतीही औपचारिक तक्रार देण्यात आलेली नाही. सर्व बाजूंनी तपास केला जात आहे, असे नेमकनूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी सांगितले.