डोर्लेवाडी : मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा तलावातून पिण्याचे अशुद्ध पाणी येत असल्याने चार गावातील सुमारे पंचवीस हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. सध्या वातावरणामध्ये सातत्याने परिणाम जाणवत आहे यामुळे वयोवृद्ध लहान मुले आजारी पडू लागले आहेत दूषित पाण्यामुळे सर्दी, खसा दुकणे, जुलाब होणे अशा त्रासाला नागरिक हैराण झाले आहेत असे असताना गेली पंधरा दिवसापासून मेखळी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी चार गावांसाठी असलेली मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या तलावातून सातत्याने पिण्याचे पाणी अशुद्ध, दूषित येत आहे यामुळे या चार गावातील सुमारे पंचवीस हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे. या योजनेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने यांना पदमुक्त करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांकडून होत आहे.
मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चार गावांच्या नागरिकांची तहान भागवत आहे मात्र येथील कर्मचारी पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कुठलीच तत्परता दाखवत नसल्याचे दिसून आले आहे. कर्मचारी रात्री तर झोपतातच मात्र दिवसादेखील झोपल्याचे आढळून आले आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आलम, टीसीएल लागणारे साहित्य प्रत्येक तासाला वापरले जाते हे वापरताना मात्र कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा केला जात आहे. यामुळे नागरिकांसाठी अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांनी देखील या योजनेच्या ठिकाणी जाऊन पिण्याच्या पाण्याची ओटीटेस्ट तपासणी केली असता सदर पाण्याची ओटी टेस्ट चा निष्कर्ष हा नकारार्थी आढळून आला आहे. यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचेच दिसून येत आहे असे पाणी या प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या तलावाच्या माध्यमातून नागरिकांना पाजले जात आहे अशा नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळणाऱ्या वर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.
मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या योजनेच्या माध्यमातून चार गावातील जवळपास 25 हजार लोकांची तहान भागवली जाते. या योजनेवर पाणी सोडण्यासाठी असलेले कर्मचारी रात्री आणि दिवसा देखील कामावर झोपतात यामुळे या तलावाचा सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे यामुळे या तलावाची सुरक्षा म्हणून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी देखील आता चार गावातील ग्रामस्थांकडून होत आहे