बाजार बंद असल्याने बळीराजाला खेळते भांडवल मिळेना
वाघळवाडी -बारामती तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हा बागायदार आहे. त्यांचे प्रमुख ऊस आहे पण त्याच्या जोडीला ते तरकारी पिकेही घेतात जेणेकरून त्यांना दैनंदिन जीवनात आर्थिक चचण भासत नाही व हातामध्येही खेळते भांडवल राहते. मात्र, करोनामुळे आठवडे बाजार बंद केल्याने त्यांचे खेळते भांडवल बंद झाले असून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम जणू लागले आहेत उसाचे पैसे मिळण्यासाठी उसाची लागण केल्यापासून ते तुटून जाईपर्यंत साधारणत 18 महिन्यांचा कालावधी लागतो.
या कालावधीनंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचना जाणवते अशावेळी शेतकरी खेळते भांडवल हातात असावी म्हणून कमी कालावधीचे तरकारी पीक घेत असतो आणि ते जवळ असलेल्या बाजारपेठांमध्ये विक्री करतात विक्रीतून त्यांना नगद पैसे हातात मिळत असतात, पण करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातील आठवडे बाजार व तालुका पातळीवरच्या बाजार भरत नसल्यामुळे शेतातील तरकारी पिकाची नासाडी होत आहे.
शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावती हा माल घेऊन विक्रीची वेळ या शेतकऱ्यांवर आली असून हा माल कमी दरामध्ये विक्री करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना चोहुबाजुंनी आर्थिक नुकसान सोसावे
लागत आहे.
भाजीपाल्याची होम डिलिव्हरी शेतकरी शेतात पिकलेला तयार झालेला भाजपाला फेकून देण्यापेक्षा आपल्या गावातील निकटवर्तीय व गरजूंना ज्या जीवन आवश्यक वस्तू लागत आहेत अशांना योग्य ती खबरदारी घेऊन त्यांच्या मागणीनुसार शेतातील ताजा भाजपाला घरपोच केला जात आहे. यानामी युक्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळत आहे. मात्र, ही सुविधा देणारे मोजकेच शेतकरी असल्याने इतर शेतकऱ्यांनी करावे तरी काय हा प्रश्न अनुत्तरीच आहे.