यवतमाळ – भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज यवतमाळ येथे एका जाहीर सभेला संबोधित करतांना निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले तसेच सत्तेत आल्यास निवडणूक आयोगाला थेट कारागृहात पाठवू असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलं. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील लक्ष्मणराव बनगीनवार मैदानावर आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
ते म्हणाले, “निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना पुलवामा हल्ल्याबाबत निवडणूक प्रचार सभांमध्ये बोलू नये असे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाचे आदेश हे संविधान विरोधी असून आमच्या संविधानाने आम्हाला आपले मत मांडण्याचा हक्क दिला आहे, मात्र निवडणूक आयोग आमच्याकडून तो हक्क हिरावून घेत आहे. मुळात निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष असल्याप्रमाणे वागत असून आम्ही सत्तेत आल्यावर निवडणूक आयोगाची रवानगी थेट कारागृहात करू” असं वक्तव्य त्यांनी केलं.
Prakash Ambedkar, the grandson of BR Ambedkar, said he would jail Election Commission for two days if voted to power
Read @ANI Story | https://t.co/3xtylYCoAE pic.twitter.com/ccDNxeHAcB
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2019