Laxman Hake : दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी 2029 साठी सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या विधानानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जय पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पवार कुटुंबावर बोचरी टीका केली आहे. “मुख्यमंत्री होण्यासाठी २८८ पैकी १५० हून अधिक आमदारांची गरज असते. ते पवार साहेबांनाही आणि दादांनाही जमले नाही. जय पवारांना ते शक्य असेल तर त्यांना शुभेच्छा.” अशी प्रतिक्रिया जय पवारांच्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंनी दिली. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “रोहित पवार विरोधात भूमिका घेतात, तर दुसरीकडे दादांच्या कुटुंबातील सदस्य सत्तेत सहभागी होऊन पदांचा लाभ घेतात. हा पवार कुटुंबाचा उद्योग आहे,” अशी बोचरी टीका केली. राज्यात होत असलेल्या जनगणनेच्या अनुषंगाने ओबीसी नेते लक्ष्मण हाके महाराष्ट्रात 100 सभा घेणार असून या सभा दोन टप्प्यात असणार आहेत. यानिमित्ताने राज्यात ओबीसी जोडो अभियान राबवणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये केली. मनोज जरांगेंना खोचक टोला (Laxman Hake) यावेळी बोलताना लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. “सरकार एका अशिक्षित व्यक्तीच्या मागण्यांना बळी पडले. ओबीसी आरक्षणावर अन्याय झाला, पण यावर कुठलाही ओबीसी नेता बोलला नाही.” तसेच “त्यांना( मनोज जरांगे) आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत,” असा खोचक टोला लगावला. Laxman Hake : “जय पवारांना ते शक्य असेल तर…”; त्या वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया, पवार कुटुंबावर केली बोचरी टीका दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची होती. आता सुनेत्रा पवार भविष्यात मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. हेही वाचा : Indian companies: भारतीय कंपन्यांचा अमेरिकेत बोलबाला ; १.७१ लाख कोटी रुपयांची उलाढाल करून रचला इतिहास