West Bengal Assembly Election 2026 – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती सभेने गाजला. ४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर बंगालमध्ये भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मी पुन्हा या राज्यात येईन, असा ठाम विश्वास पंतप्रधानांनी सोमवारी व्यक्त केला. (West Bengal Assembly Election 2026) उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ऐतिहासिक बॅरकपूर येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना मोदींनी तृणमूल काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. PM Narendra Modi And CM Mamata Banerjee १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, ज्याप्रमाणे बॅरकपूरने देशाच्या स्वातंत्र्याची ठिणगी टाकली, त्याचप्रमाणे ही भूमी आता बंगालमधील राजकीय परिवर्तनाची साक्षीदार ठरेल. ओडिशा आणि बिहारप्रमाणेच आता बंगालमध्येही ‘कमळ’ फुलेल, असे संकेत त्यांनी दिले. पंतप्रधानांनी ममता बॅनर्जी सरकारच्या ‘माँ, माटी, मानुष’ या घोषणेवर टीका करत, टीएमसीने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. राज्यात कारखाने बंद पडत आहेत आणि त्याऐवजी कच्चे बॉम्ब बनवण्याचे कारखाने उभे राहत आहेत. टीएमसीचे सिंडिकेट राज आजही गुन्हेगारी टोळ्यांना संरक्षण देत आहे, असे मोदी म्हणाले. बंगालच्या विकासासाठी टीएमसीकडे कोणतेही व्हिजन नसून केवळ भ्रष्टाचार आणि हिंसाचार हेच त्यांचे धोरण असल्याचे त्यांनी नमूद केले. हीच टीएमसीची रणनीती : (West Bengal Assembly Election 2026) प्रशासनावर लक्ष देण्याऐवजी टीएमसी केवळ शिवीगाळ आणि दडपशाही करत असल्याचा आरोप मोदींनी केला. त्यांनी केवळ माझाच नव्हे, तर घटनात्मक संस्था आणि लष्कराचाही अपमान केला आहे. बंगालची सेवा करणे आणि त्याचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान भावनिक साद घालत म्हणाले. मतदानासाठी बाहेर पडून या ‘टोळीशाही’चा पराभव करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सभेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण शेवटच्या टप्प्यात अधिकच तापले आहे.