बीड: पुतण्यानी केलेल्या आरोपावर फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिले असून, ते म्हणले की पैशाने कधी पद विकत मिळत नसतं, हा आरोप म्हणजे केवळ बालिशपणा आणि संस्कारहीन प्रवुत्ती आहे. तसेच नशेमध्ये बोलणाऱ्यांच्या आरोपाकडे मी लक्ष देत नसल्यचा पालटवरही त्यांनी केला आहे.
दरम्यान आमच्या काकांनी 50 कोटी रुपये देऊन मंत्रिपद घेतलं आहे. असा गंभीर आरोप जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील सभेत केला होता. त्यावर जयदत्त क्षीरसागर यांनी हे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे.
जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, “मी माझ्या एकूण राजकीय आयुष्यात चरित्र आणि चारित्र्य याला खूप महत्त्व देतो. त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांवर जास्त स्पष्टीकरण देणार नाही. तसंच पैसे देणे आणि घेणे हे माझ्या कुठल्याच निकषात बसत नाही. पैशाने कधी पद विकत मिळत नसतं, हा आरोप म्हणजे केवळ बालिशपणा, संस्कारहीन आणि टुकारपणा आहे.”