मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांचा पहिला टप्पा नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांमध्ये उमेदवारांकरता येणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खर्चाची वाढलेली मर्यादा – संस्थेचा वर्ग अध्यक्षपदासाठी (खर्च मर्यादा) सदस्यपदासाठी (खर्च मर्यादा) अ वर्ग नगरपरिषद ₹ १५ लाख ₹ ५ लाख ब वर्ग नगरपरिषद ₹ ११ लाख २५ हजार ₹ ३ लाख ५० हजार क वर्ग नगरपरिषद ₹ ७ लाख ५० हजार ₹ २ लाख ५० हजार नगरपंचायत ₹ ६ लाख ₹ २ लाख २५ हजार महत्त्वाची घोषणा: वाढती महागाई आणि प्रचाराचा खर्च लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी ६ लाख तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ईव्हीएमवरच होणार मतदान – निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ३ हजार ५७६ मतदार आहेत. यासाठी १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांची मतदान प्रक्रिया ईव्हीएमद्वारेच (EVM) होणार असल्याचे मुख्य आयुक्तांनी सांगितले. मतदार यादी (३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध) मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार. असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम – टप्पा तारीख अर्ज दाखल करण्यास सुरुवात १० नोव्हेंबर २०२५ अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५ अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर २०२५ आक्षेप असलेल्या ठिकाणी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५ निवडणूक चिन्ह व उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर २०२५ मतदान २ डिसेंबर २०२५ मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ निकाल जाहीर करण्याचा दिवस १० डिसेंबर २०२५ सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर आयोगाने या निवडणुकांचा पहिला टप्पा जाहीर केला आहे.