नवी दिल्ली – तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस-द्रमुक आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शहा म्हणाले की, सत्तेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाची प्रतिष्ठा उंचावली, तर या दोन्ही पक्षांनी तामिळनाडूचा विकास रोखण्याचे काम केले. Shah on Next PM
दक्षिणेतील भाजपचा सततचा पराभव पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळ पंतप्रधानपदाची वकिली करून मोठा डाव खेळला आहे. खरे तर शेवटच्या दिवशी शाह यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बंद खोलीत बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शाह म्हणाले की, ‘२०२४ मध्ये कोणताही सर्वसामन्य गरीब तमिळ व्यक्तीनं पंतप्रधान व्हावं’ अशी माझी इच्छा आहे.
अमित शाह तमिळ व्यक्तीनं पंतप्रधान व्हावं असे विधान करून द्रमुकला कोंडीत पकडण्याची प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. खरेतर, द्रमुकने अलीकडेच म्हटले होते की ते तामिळनाडू तसेच पुद्दुचेरीमधील सर्व 39 लोकसभा जागा जिंकतील. ‘तमिळ पंतप्रधान’ हे विधान तामिळनाडूमध्ये भाजपची पकड मजबूत करणार म्हणून म्हटल्याची चर्चा होत आहे म्हणूनही पाहिले जात आहे. Shah on Next PM
अमित शहांचा पक्षातील घराणेशाहीवर हल्लाबोल – काँग्रेस आणि द्रमुक 2G, 3G आणि 4G पक्ष
“काँग्रेस आणि द्रमुक हे 2G, 3G आणि 4G पक्ष आहेत. मी 2G घोटाळ्याबद्दल बोलत नाही… इथे 2G म्हणजे 2 पिढ्या, 3G म्हणजे 3 पिढ्या, 4G म्हणजे 4 पिढ्या. मुरसोली मारन कुटुंब 2G, कारण त्यांच्या 2 पिढ्यांनी भ्रष्टाचार केला.
करुणानिधी कुटुंब 3G आहे, कारण तीन 3 पिढ्या भ्रष्टाचारात अडकल्या होत्या. गांधी घराणे 4G आहे, राहुल गांधी चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत.