कोल्हापूर(प्रतिनिधी) – जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्य़ाने वाढ झाली असून राजाराम बंधारा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधाऱ्यावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे.
जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने गेल्या पाच तासात पाण्याच्या पातळीत तीन फुटांची वाढ झाली आहे. राजाराम बंधारा सह शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे.