Actress Ruchita Jadhav : ३० अॅाक्टोबरच्या दिवशी मुंबईत एखाद्या थ्रीलर सिनेमासारखी एक घटना घडली. ज्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला. रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुंबईतील आर. के. स्टुडिओत १७ ते १९ मुलांना ओलीस ठेवले होते. या घटनेची माहिती काही क्षणातच महाराष्ट्रात पसरली आणि मोठी खळबळ उडाली. रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्यामागे त्याच्या काही मागण्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांच्या हल्ल्यात आर्य जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी एका मराठी अभिनेत्रीने मोठा खुलासा केल्याने हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे दिसत आहे. हेही वाचा : Pune District : राजगड तालुक्यात भाजपकडून तगडी फौज झेडपी; पंचायत समितीसाठी २६ इच्छुक रिंगणात : मोर्चेबांधणीला वेग पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आर्याचा मृत्यू झाला असून, ही बातमी पाहिल्यानंतर अभिनेत्री रुचिता जाधवला मोठा धक्का बसला आहे. तिने याबाबत बोलताना मोठा खुलासा करत त्याने केलेला हा संपूर्ण प्रकार एखाद्या सिनेमासारखाच होता. हाच प्रकार एक सिनेमाचा सीन म्हणून सांगितला होता आणि सिनेमाची ऑफरही दिली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री याविषय़ी सांंगितले आहे. अभिनेत्री रुचिता जाधव मराठी मालिकाविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. पुढे बोलताना ती म्हणाली “त्याने मला ४ ऑक्टोबरला प्रोजेक्टसंदर्भात चर्चा करायची म्हणून मेसेज केला होता. आम्ही फोनवर बोलू असं ठरवलं. अर्ध्या तासात फोन करतो असं तो म्हणाला. फ्री झाल्यावर फोन कर असं मी त्याला म्हटलं. मग त्याने मला फ्री झाल्यावर मेसेज केला. त्याने मला सिनेमाबद्दल सांगितलं. त्याने मला जो काही सीन सांगितला तो तसाच सीन त्याने पवईमध्ये केला, असे अभिनेत्रीने सांगितले आहे. यावर अभिनेत्रीने तिच्या भूमिकेबद्दल विचारल्यावर एक शिक्षिका जी किडनॅप होते. किंवा मग एखाद्या मुलाची आई, असे त्याने सांगितल्याचे अभिनेत्री म्हणाली. मी काही मुलांनाही ऑडिशनला बोलवतोय तर तिथे तू ये, तुझंही बघणं होईल, असेही आर्य म्हणाल्याचे अभिनेत्रीन रुचिरा जाधव हिने सांगितले आहे. हेही वाचा : phaltan case: दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा, सातारा जिल्हा रुग्णालयाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश