Amrish Puri : मिस्टर इंडियामधला ‘तो’ डॅायलॅाग अन् अमरीश पुरींना ओळख मिळाली; म्हणून बॅालीवूडमधला खलनायक आजही आहे अजरामर

हिंदी सिनेमा इंडस्ट्रमधील सर्वाधिक काळ खलनायकाची भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेेते अमरीश पुरी १२ जानेवारी २००५ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादूने रसिकांच्या मनात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. ते आजही कायम आहे. आजही टीव्हीवर त्यांचे सिनेमे लागले, तर प्रेक्षक तितक्याच उत्सुकतेने हे सिनेमे बघतात. अमरीश पुरी यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांनी केलेले काही असे सिनेमे आहेत की त्यातली खलनायकाची पात्र अजरामर झाली आहेत.
हिरोपेक्षा खलनायक म्हणून पसंती
१९७१ साली अमरीश पुरी यांना सिनेमा इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यावेळी रेश्मा और शेरा या सिनेमातून त्यांनी अभिनयाची सुरूवात केली. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती अभिनेता अनिल कपुर आणि श्री देवी यांची मुख्य असलेल्या मिस्टर इंडिया या सिनेमाने. या सिनेमात अमरीश पुरी यांनी साकारलेलं मोगॅम्बोचे पात्राने प्रेक्षकांच्या मनात वर्चेस्व प्रस्थापित केलं. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधला सिंग चौधरी त्यांनी उत्तमप्रकारे साकारला होता. नंतरच्या काळातही त्यांनी भरपूर सिनेमे केले. सरकारी नोकरी सोडून त्यांनी अभिनय करायचं मनाशी पक्क केलं होतं. पण हिरोपेक्षा त्यांना खलनायक म्हणूनच ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले.
ही पात्र ठरली लक्षवेधी
1967 मध्ये ‘शांतु कोर्ट चालू आहे’ या मराठी चित्रपटात देखील त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक सिनेमे त्यांनी केले आहेत. 1987 मध्ये रिलीज झालेल्या ‘मिस्टर इंडिया’मध्ये मोगॅम्बो, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये बलदेव सिंग चौधरी, 1986 मध्ये श्रीदेवीच्या ‘नगीना’ सिनेमात भैरोनाथ, ‘करण-अर्जुन’मध्ये ठाकूर दुर्जन सिंग आणि ‘गदर’ सिनेमात मेजर अश्रफ अली हे पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेली आहेत.
आजारी असूनही सिनेमात काम
12 जानेवारी 2005 रोजी अमरीश पुरी यांनी वयाच्या 72 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. 2003 मध्ये त्यांना आजराने ग्रासले होते. या आजारामुळे त्यांना भूक लागत नव्हती आणि ते अशक्त होत चालले होते, असे असतानाही त्यांनी काही सिनेमे साईन केले ते पूर्ण केले. यामध्ये ‘मुझ से शादी करोगे’, ‘किस्ना’, ‘हलचल’ आणि ‘ऐतराज’ अशा पाच सिनेमांचा समावेश होतो.
मोगॅम्बोने टर्निंग पॅांईन्ट
अमरीश पुरी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तेलुगू, मराठी, पंजाबी, मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे. 1987 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा त्यांच्या अभिनय क्षेत्रातील टर्निंग पॅाईंट ठरला. या सिनेमातील ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग खूप लोकप्रिय झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 1967 ते 2005 दरम्यान त्यांनी 450 सिनेमांमध्ये काम केलं आहे. या सर्वच सिनेमांमध्ये त्यांनी दमदार अभिनय करून स्वत:चे नाव कमावले आहे. अमरीश पुरी जेव्हा जेव्हा मोठ्या पडद्यावर दिसले तेव्हा त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.
पहिली स्क्रीन टेस्ट फेल
बॉलीवूडचा खलनायक म्हणून ओळख मिळवलेली अमरीश पुरी त्यांच्या पहिल्याच स्क्रीन टेस्टमध्ये अपात्र झाले होते. त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ कामगार आणि रोजगार मंत्रालयात काम केले. यानंतर त्यांनी नोकरीसोबतच पृथ्वी थिएटरमध्ये काम करायला सुरूवात केली. त्यानंतर १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर अभिनेता ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘हम पांच’, ‘विधाता’, ‘विरासत’, ‘दामिनी’, ‘बादशाह’, ‘सौदागर’ आणि ‘गदर एक प्रेम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसले.





