Hardik Pandya set to join MI squad in Raipur : आयपीएल २०२६ मध्ये सलग पराभवाचा सामना करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे मागील काही काळ संघाबाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार हार्दिक पंड्या आज रात्री रायपूरमध्ये संघाशी जोडला गेला आहे. १० मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हार्दिकचे पुनरागमन मुंबईसाठी महत्त्वाचे मानले जात आहे. हार्दिकची उपलब्धता वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून – ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, हार्दिक पंड्या आज रात्री छत्तीसगडची राजधानी रायपूरसाठी रवाना झाला आहे. तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यात प्रत्यक्ष मैदानात उतरणार की नाही, याचा अंतिम निर्णय मुंबई इंडियन्सची वैद्यकीय टीम घेणार आहे. जरी तो प्लेइंग इलेव्हनचा भाग नसला, तरी १० मे रोजी तो ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित राहून संघाला प्रोत्साहन देणार असल्याचे निश्चित झाले आहे. हार्दिकचे येणे मुंबईसाठी अशा वेळी घडत आहे जेव्हा संघाचा स्टँड-बाय कॅप्टन सूर्यकुमार यादव घरी मुलीचे आगमन झाल्यामुळे आगामी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. Checked-in Raipur ✅ pic.twitter.com/hXkssQF5zr — Mumbai Indians (@mipaltan) May 7, 2026 मुंबईसाठी यंदाचा हंगाम ठरला वाईट स्वप्न – 🚨 CAPTAIN HARDIK PANDYA IS BACK 🚨 – Hardik Pandya joined Mumbai Indians squad at Raipur. – Hardik Pandya is ready to playing against RCB on May 10th. pic.twitter.com/88NlRF4732 — Cricket Central (@CricketCentrl) May 7, 2026 मुंबई इंडियन्ससाठी हा मोसम अत्यंत खराब ठरला आहे. १० सामन्यांपैकी संघाने ७ सामने गमावले असून केवळ ३ विजय त्यांच्या पदरात पडले आहेत. गुणतालिकेत ८ व्या स्थानावर असलेल्या मुंबईचा रनरेटही उणे (Minus) मध्ये आहे. खुद्द हार्दिक पंड्यालाही या हंगामात आपली जादू दाखवता आलेली नाही. एका मुलाखतीत त्याने मान्य केले की, त्याच्यासाठी केवळ एखादा सामना नाही, तर हा संपूर्ण हंगामच निराशाजनक राहिला आहे. हेही वाचा – Mitchell Marsh Century : मिचेल मार्शचं झंझावाती शतक! ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडत लखनौसाठी नोंदवला खास पराक्रम प्लेऑफच्या आशा धूसर? मुंबईला आता उर्वरित चारही सामने जिंकणे अनिवार्य आहे. जर संघाने सलग चार विजय मिळवले तरी त्यांचे १४ गुण होतील. मात्र, इतर संघांची कामगिरी आणि मुंबईचा खराब रनरेट पाहता, त्यांचे प्लेऑफमध्ये पात्र ठरणे कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत हार्दिकचे पुनरागमन संघाचे मनोबल किती उंचावते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.