Harbhajan Singh Security Withdrawn: पंजाब सरकारने हरभजन सिंगची सुरक्षा काढली ; घराबाहेरील सुरक्षा कर्मचारी हटवले
Harbhajan Singh Security Withdrawn: आम आदमी पार्टीमध्ये (आप) मोठी फूट पडल्याच्या बातम्यादरम्यान, पंजाबमधील भगवंत मान सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांची सुरक्षा काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Harbhajan Singh Security Withdrawn: आम आदमी पार्टीमध्ये (आप) मोठी फूट पडल्याच्या बातम्यादरम्यान, पंजाबमधील भगवंत मान सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांची सुरक्षा काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
‘टर्बिनेटर’ म्हणून ओळखले जाणारे हरभजन सिंग लवकरच ‘आप’ सोडून भाजपमध्ये सामील होतील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्याच दरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे. पंजाब सरकारच्या या निर्णयानंतर हरभजन सिंग यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
हरभजन सिंग यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए), मनदीप सिंग यांनी याविषयी माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना, “पंजाब सरकारने अचानक त्यांची संपूर्ण पोलीस सुरक्षा काढून घेतली आहे.” असे म्हटले. तसेच हरभजन सिंग यांच्या घराबाहेर तैनात असलेले सुमारे नऊ ते दहा सुरक्षा कर्मचारी हटवण्यात आले आहेत आणि त्यांना देण्यात आलेली सरकारी पायलट कारही परत घेण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेचे मूळ नुकतेच भाजपमध्ये सामील झालेल्या राघव चड्ढा यांनी केलेल्या दाव्यात आहे. चड्ढा यांनी म्हटले होते की, आम आदमी पार्टीच्या दहा राज्यसभा खासदारांपैकी सात जण पक्ष सोडून भाजपच्या संपर्कात आहेत. या सात संभाव्य उमेदवारांमध्ये हरभजन सिंग यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.
हरभजन सिंग यांनी या अटकळांवर आतापर्यंत मौन बाळगले असले तरी, सुरक्षा काढून घेणे हे सरकारच्या नाराजीचे स्पष्ट चिन्ह म्हणून पाहिले जात आहे. शनिवारी सकाळी, हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर काळ्या शाईने ‘पंजाबचा गद्दार’ असे शब्द लिहिण्यात आले होते.
याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक ‘गद्दार’ असे स्प्रे-पेंट करताना दिसत आहेत. जवळच पोलीस उभे असूनही, त्यांना हटवण्यासाठी त्यांनी कोणताही विशेष प्रयत्न केल्याचे दिसले नाही.
शनिवारीच, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांना ‘गद्दार’ संबोधून त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चंदीगड येथे एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या नेत्यांनी केवळ पक्षालाच नव्हे, तर पंजाबच्या लोकांच्या विश्वासालाही धक्का पोहोचवला आहे.
भगवंत मान यांनी आरोप केला की, भाजपला पंजाब आणि पंजाबी लोकांशी समस्या आहे. त्यांच्या मते, पंजाबच्या लोकांच्या हिताच्या कोणत्याही गोष्टीत भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न करते. मान म्हणाले की, आम आदमी पार्टी ही कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठी आहे आणि काही लोकांच्या जाण्याने पक्षावर किंवा पंजाबच्या राजकारणावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही. Harbhajan Singh Security Withdrawn:






