पालघर – गुजरातमधील एका तरुण तेल व्यापाऱ्याचे अपहरण करून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
नीलेश रावळ असे या व्यापाऱ्याने नाव असून तो 29 वर्षीय आहे. त्याचा मृतदहे तलासरी तालुक्यातील कुरजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी आढळून आला.
काही स्थानिक लोकांना त्यांचा हा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. त्यांच्या डोक्यावर मारहाण करण्यात आल्याच्या खुणा सापडल्या आहेत.
रावळ हे मूळचे गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातील उमरगावचे रहिवासी आहेत. खाद्यतेलाच्या ऑर्डरसाठी ते दर बुधवारी तलासरीला जात असत. त्यानुसार असेच ते गेल्या बुधवारी येथे आले होते. पण त्यानंतर ते गायब झाले. त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.