मुंबई: दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार असून पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा घ्यावा. आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात पडलेला दुष्काळ आणि त्यातच तापमानाच्या वाढत्या पा-यामुळे ग्रामीण भागात सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उन्हाच्या झळा वाढत चालल्याने पाण्यासाठी महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक नागरिक स्थलांतरित होत असल्याने दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी अनेक कामे तातडीने पूर्ण करायची आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील उपाययोजनांसाठी राज्यातील निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.