डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी भारतातील महू येथील एका दलित महार कुटुंबात झाला. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर यांना बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर म्हणून ओळखले जाते. ते भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार जागतिक दर्जा वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येते. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता.
मध्य प्रदेश आणि बिहारच्या चांगल्या विकासासाठी बाबासाहेबांनी 50 च्या दशकात या राज्यांच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला होता. परंतु, 2000 नंतरच मध्य प्रदेश आणि बिहारचे विभाजन करून छत्तीसगड आणि झारखंडची निर्मिती झाली. बाबासाहेबांच्या खाजगी ग्रंथालय “राजगढ’ मध्ये 50 हजारांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. ती जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती. आंबेडकरांनी लिहिलेले “वेटिंग फॉर अ व्हिसा’ हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठातील पाठ्यपुस्तक आहे. कोलंबिया विद्यापीठाने 2004 मध्ये जगातील टॉप 100 विद्वानांची यादी तयार केली. त्या यादीत पहिले नाव बाबासाहेबांचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 64 विषयात पारंगत होते. त्यांना हिंदी, पाली, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती अशा 9 भाषांचे ज्ञान होते. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 8 वर्षांचे शिक्षण अवघ्या 2 वर्षे 3 महिन्यांत पूर्ण केले. आजच्या या दिनी थोर महामानवाला विनम्र अभिवादन.
भारताला संविधान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 14 एप्रिल रोजी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरष म्हणून ओळखले जातात. महामानव डॉ. आंबेडकर यांची जयंती दरवर्षी आजच्या यादिवशी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. संपुर्ण देशभरात भीम जयंतीनिमित्त विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती आज आपण जाणून घेऊया.- नारायण सातपुते (रेठरे बुद्रुक)